Friday 17 February 2012

महाराष्ट्र जनमानस

महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. १० पैकी ६ महानगरपालिका कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. मुंबईत सेनेन खरच करून दाखवल. नाशिकात मनसेला प्रचंड यश मिळालय. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली पकड कायम ठेवत २० जिल्हा परिषदांवर विजय मिळवला आहे. आघाडीचे ९०० उमेदवार निवडून आलेत. नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आणि अजित पवारांना चोख उत्तर दिले. गोपीनाथ मुंडे यांनी देखील आपल्या जागा राखल्या. खरा फटका बसलाय तो भुजबळ आणि विखे पाटील यांना. मनसेने पुणे, नाशिक आणि नगर महानगरपालिकेत अनपेक्षित यश मिळवलं. पंचायत समिती निवडणुकांचे निकाल बघितल्यावर एकच गोष्ट लक्षात येते कि ग्रामीण महाराष्ट्रात जे संघटन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीजवळ आहे त्या संघटनाला सेनेजवळ पर्याय नाही. याही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अण्णा हजारे यांचा कोणताही प्रभाव दिसला नाही.

1 comment:

UEH said...

ब्लॉग वरील माहिती उत्कृष्ट रित्या मांडली आहे.
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस..
http://themarathi-blog.blogspot.in/

ShareThis

Registered With