Wednesday 8 February 2012

शाहू महाराजांचे विस्मरण ?

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

No comments:

ShareThis

Registered With